*चित्तथरारक क्रिकेट मँच*
एक दिवस कृषि महाविद्यालयाच्या आपल्या जिमखान्या समोरील मैदानावर सिनियर्स विरूध्द ज्युनियर्स क्रिकेट मँचचे आयोजन करण्यात आले होते. सिनियर्सचे कप्तान होते क्रिकेटचे आशिक राजेंद्र कांबळे (सध्या T O Satara)
ज्युनियर्स टीमचा कप्तान कोण ते आता नक्की आठवत नाही पण या मैचमध्ये thrill आणण्याच्या बाबतीत मनोज बोडकेची आठवण होते. दुर्दैवाने मनोज आज आपल्यात नाही.
हा सामना चांगलाच अटीतटीचा होणार याचा अंदाज तसा सर्वाना होताच. या सामन्यासाठी पंच कोण नेमायचे हा मोठा प्रश्न होता. कारण
दोन्ही टीम मध्ये जसे हुशार, शांत व समंजस खेळाडू होते तसेच आगाऊ व 'पट्टीच्या' खेळाडूंचीही काही कमतरता नव्हती.सर्वानुमते मग अप्पासाहेब धुळाज (सध्या अपर जिल्हाधिकारी) यांचेकडे पंच म्हणून जबाबदारी देण्यात आली
नाणेफेक झाली. प्रथम ज्युनियर्स ची फलंदाजी होती .मी स्वयंघोषित कॉमेंटेटरच्या भूमिकेत. स्पीकर नव्हता तरी उत्साह दांडगा होता.
एखाद्या महत्वाचेया आंतरराष्ट्रीय सामन्यासारखे थ्रिल प्राप्त झालेल्या सामन्यात ज्युनियर्सनी 100 धावा केल्या होत्या अन जिंकायला टार्गेट होते 101.
सिनियर्सची फलदाजी सुरु झाली.ज्युनियर टीम मध्ये मनोज जाधव हा (सध्या P I मुंबई) एक अष्टपैलू अस्सल सातारी खेळाडु होता .
तस पाहीलं तर मनोजचा खेळ आणि आमचा जल्लोष व पाठबळ हीच काय ती ज्युनियर्सची जमेची बाजू व रणनीती .
शेवटचे षटक होते. सिनियर्सना जिंकण्यास ६ धावाची आवश्यकता होती. सिनियर्स संघाचा कर्णधार राजू कांबळे फलदांज आणि गोलंदाज अर्थात मनोज जाधव.
जणू आंतरराष्ट्रीय सामन्यासारखा चित्तथरारक व आम्हा पाठीराख्या प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारा हा प्रसंग.
मनोजने पहिला चेंडू टाकला आणि तो निर्धाव पडला. सर्व ज्युनियर्सचे प्लेअर व आम्ही पाठीराखेदेखील मैदानात
सर्वजण मनोजला भेटून प्रोत्साहन देत होते.
कोणी रुमालानी चेडु पुसून देत होता तर कोणी पंचाना सांगत होते निर्णय योग्य द्यायचा. आम्हाला हार पाहायची सवय नाही
फलंदाजावर दडपण आणि मनोज जाधवने दुसरा चेंडू टाकला तोही निर्धाव. सर्वत्र एकच जल्लोष . राजू जरी कसलेला फलंदाज असला तरी त्याच्यावरील दडपण वाढले आणि मनोज चा तिसरा चेडु देखील निर्धाव पडल्यावर काय विचारूच नका. काय प्रचंड तणाव, उत्सुकता शिगेला पोहोचलेली. आम्ही काही जणनी हात वर करुन मैदानाला एक राऊंड टाकला.
फलंदाजाच्या तणावात अधिकच भर आणि मनोजचा चौथा चेंडूही जेंव्हा निर्धाव पडला तेंव्हा तर आम्ही सर्वानी सारे मैदान डोक्यावर घेतले.सैरावैरा धावायला लागलो. कोण कोल्हाटी उड्या मारतंय तर कोणी आनंदात मैदानावर गडगडा लोळतंय असा सारा माहौल.
प्रचंड तणाव, आनंदमिश्रीत उत्सुकता आणि मनोजने पाचवा चेंडू टाकला . तो देखील जेंव्हा निर्धाव पडला तेंव्हा काय विचारता योय नाही असा
ज्युनियर्सचा जल्लोष.आता समीकरण होते केवळ १ चेंडु आणि जिंकायला आवश्यक होत्या ६ धावा.
मग काय मनोजला आणि राजू कांबळेला सुचनांचा नुसता पाऊस
पंचाना काहीचा गराडा.
मला सचिन लोंढे अभय जाधव(आबड्या) मनोज बोडके आम्हाला मनोज बाबत पक्की खात्री होती मनोज हा अतिषय हुषार शांत व संयमी असा आमचा गुणी खेळाडू होता. सर्वाच्या सूचना देऊन झाल्या. मनोज परत आपल्या बोलिंग मार्कवर. प्रचंड शांतता आणि खिळलेल्या उत्सुक नजरा.
मनोजने ६ वा चेंडू टाकला आणि अर्थात तोही निर्धावच. ज्युनियर्सनी हा सामना जिंकला होता.
आम्ही सर्वानी अगदी मैदान डोक्यावर घेतले होते.
भारताने वर्ल्ड कप सामना एकदा हारला होता आणि विनोद कांबळी तेथेच बसून रडला होता अगदी तसेच राजू काबळेचे झालेले आणि तो देखील तडक आपल्या खोलीत जाऊन ढसढसा रडला होता.
मग विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरु झाली आम्ही राजारामपुरीत जाऊन स्टेरीओ साऊंडला संध्याकाळची ऑर्डर दिली
मी , मनोज बोडके आबड्या शहरातुन जरा जरा सोमरस घेऊन आलो
मग काय डान्सला सुरुवात झाली.
तुफान डान्स झाला त्यामध्ये डिस्को भांगडा खेकडा असे अनेक प्रकारचे डान्स झालेआणि मग रात्री १२ ते१ दरम्यान सर्वजण झोपायला रुम मध्ये गेले नेहमीप्रमाणे लोंढे आबड्या मन्या बोडके आणि मी T V हॉलला झोपायला गेलो. सुमारे तीस वर्षापूर्वीच्या या चित्तथरारक सामन्याची आठवण आजही मनावर ताजी आहे.
लेखन - आप्पा गौड *के 86 Agricos मित्र*
एक दिवस कृषि महाविद्यालयाच्या आपल्या जिमखान्या समोरील मैदानावर सिनियर्स विरूध्द ज्युनियर्स क्रिकेट मँचचे आयोजन करण्यात आले होते. सिनियर्सचे कप्तान होते क्रिकेटचे आशिक राजेंद्र कांबळे (सध्या T O Satara)
ज्युनियर्स टीमचा कप्तान कोण ते आता नक्की आठवत नाही पण या मैचमध्ये thrill आणण्याच्या बाबतीत मनोज बोडकेची आठवण होते. दुर्दैवाने मनोज आज आपल्यात नाही.
हा सामना चांगलाच अटीतटीचा होणार याचा अंदाज तसा सर्वाना होताच. या सामन्यासाठी पंच कोण नेमायचे हा मोठा प्रश्न होता. कारण
दोन्ही टीम मध्ये जसे हुशार, शांत व समंजस खेळाडू होते तसेच आगाऊ व 'पट्टीच्या' खेळाडूंचीही काही कमतरता नव्हती.सर्वानुमते मग अप्पासाहेब धुळाज (सध्या अपर जिल्हाधिकारी) यांचेकडे पंच म्हणून जबाबदारी देण्यात आली
नाणेफेक झाली. प्रथम ज्युनियर्स ची फलंदाजी होती .मी स्वयंघोषित कॉमेंटेटरच्या भूमिकेत. स्पीकर नव्हता तरी उत्साह दांडगा होता.
एखाद्या महत्वाचेया आंतरराष्ट्रीय सामन्यासारखे थ्रिल प्राप्त झालेल्या सामन्यात ज्युनियर्सनी 100 धावा केल्या होत्या अन जिंकायला टार्गेट होते 101.
सिनियर्सची फलदाजी सुरु झाली.ज्युनियर टीम मध्ये मनोज जाधव हा (सध्या P I मुंबई) एक अष्टपैलू अस्सल सातारी खेळाडु होता .
तस पाहीलं तर मनोजचा खेळ आणि आमचा जल्लोष व पाठबळ हीच काय ती ज्युनियर्सची जमेची बाजू व रणनीती .
शेवटचे षटक होते. सिनियर्सना जिंकण्यास ६ धावाची आवश्यकता होती. सिनियर्स संघाचा कर्णधार राजू कांबळे फलदांज आणि गोलंदाज अर्थात मनोज जाधव.
जणू आंतरराष्ट्रीय सामन्यासारखा चित्तथरारक व आम्हा पाठीराख्या प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारा हा प्रसंग.
मनोजने पहिला चेंडू टाकला आणि तो निर्धाव पडला. सर्व ज्युनियर्सचे प्लेअर व आम्ही पाठीराखेदेखील मैदानात
सर्वजण मनोजला भेटून प्रोत्साहन देत होते.
कोणी रुमालानी चेडु पुसून देत होता तर कोणी पंचाना सांगत होते निर्णय योग्य द्यायचा. आम्हाला हार पाहायची सवय नाही
फलंदाजावर दडपण आणि मनोज जाधवने दुसरा चेंडू टाकला तोही निर्धाव. सर्वत्र एकच जल्लोष . राजू जरी कसलेला फलंदाज असला तरी त्याच्यावरील दडपण वाढले आणि मनोज चा तिसरा चेडु देखील निर्धाव पडल्यावर काय विचारूच नका. काय प्रचंड तणाव, उत्सुकता शिगेला पोहोचलेली. आम्ही काही जणनी हात वर करुन मैदानाला एक राऊंड टाकला.
फलंदाजाच्या तणावात अधिकच भर आणि मनोजचा चौथा चेंडूही जेंव्हा निर्धाव पडला तेंव्हा तर आम्ही सर्वानी सारे मैदान डोक्यावर घेतले.सैरावैरा धावायला लागलो. कोण कोल्हाटी उड्या मारतंय तर कोणी आनंदात मैदानावर गडगडा लोळतंय असा सारा माहौल.
प्रचंड तणाव, आनंदमिश्रीत उत्सुकता आणि मनोजने पाचवा चेंडू टाकला . तो देखील जेंव्हा निर्धाव पडला तेंव्हा काय विचारता योय नाही असा
ज्युनियर्सचा जल्लोष.आता समीकरण होते केवळ १ चेंडु आणि जिंकायला आवश्यक होत्या ६ धावा.
मग काय मनोजला आणि राजू कांबळेला सुचनांचा नुसता पाऊस
पंचाना काहीचा गराडा.
मला सचिन लोंढे अभय जाधव(आबड्या) मनोज बोडके आम्हाला मनोज बाबत पक्की खात्री होती मनोज हा अतिषय हुषार शांत व संयमी असा आमचा गुणी खेळाडू होता. सर्वाच्या सूचना देऊन झाल्या. मनोज परत आपल्या बोलिंग मार्कवर. प्रचंड शांतता आणि खिळलेल्या उत्सुक नजरा.
मनोजने ६ वा चेंडू टाकला आणि अर्थात तोही निर्धावच. ज्युनियर्सनी हा सामना जिंकला होता.
आम्ही सर्वानी अगदी मैदान डोक्यावर घेतले होते.
भारताने वर्ल्ड कप सामना एकदा हारला होता आणि विनोद कांबळी तेथेच बसून रडला होता अगदी तसेच राजू काबळेचे झालेले आणि तो देखील तडक आपल्या खोलीत जाऊन ढसढसा रडला होता.
मग विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरु झाली आम्ही राजारामपुरीत जाऊन स्टेरीओ साऊंडला संध्याकाळची ऑर्डर दिली
मी , मनोज बोडके आबड्या शहरातुन जरा जरा सोमरस घेऊन आलो
मग काय डान्सला सुरुवात झाली.
तुफान डान्स झाला त्यामध्ये डिस्को भांगडा खेकडा असे अनेक प्रकारचे डान्स झालेआणि मग रात्री १२ ते१ दरम्यान सर्वजण झोपायला रुम मध्ये गेले नेहमीप्रमाणे लोंढे आबड्या मन्या बोडके आणि मी T V हॉलला झोपायला गेलो. सुमारे तीस वर्षापूर्वीच्या या चित्तथरारक सामन्याची आठवण आजही मनावर ताजी आहे.
लेखन - आप्पा गौड *के 86 Agricos मित्र*
No comments:
Post a Comment